Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक हवीच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. या निवडणुकीत उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मराठीच्या संवर्धनासाठी केलेले कार्य आणि भूमिका समग्रपणे प्रगल्भ मतदारांसमोर मांडण्यासाठी प्रचाराचीही आवश्यकता आहे. त्यामुळे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हायलाच हवी, असे मत समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी येथे व्यक्त केले.

डोंब‌िवली येथे होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. डॉ. काळे यांनी संमेलनाध्यपदासाठी आपली दावेदारी जाहीर करीत गुरुवारी अर्ज दाखल केला. घटक संस्था म्हणून विदर्भ साहित्य संघाकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. डॉ. प्रभा गणोरकर यांनी त्यांचे नाव सुचविले असून डॉ. रमेश अंधारे, डॉ. हेमंत खडके, विनोद लोकरे, अरुणा सबाने आणि डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी अनुमोदन दिले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ. काळे यांनी निवडणूक लढविण्यामागील भूमिका स्पष्ट केली. मराठीचे अस्तित्व आणि संवर्धन हे प्रश्न जिकिरीचे बनले आहेत. मराठी लेखनव्यवहार, प्रकाशनव्यवहार आणि वाचनसंस्कृती यावर पुनर्विचार करून त्यांच्या संवर्धनाची दिशा ठरविणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे, इतर कोणत्याही मुद्द्याऐवजी साहित्य हाच मुख्य अजेंडा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. साहित्य संमेलन हे साहित्य-समाज-संस्कृतीच्या चिंतनाचे सर्वश्रेष्ठ व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावरून मराठी समाज, भाषा आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी वचनबद्ध असणाऱ्या क्रियाशील रस‌‌िकांशी संवाद करणे आणि त्यांच्या संवर्धनाच्या योग्य दिशा ठरवणे, यासाठी संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लढवित असल्याचे ते म्हणाले. आपले प्रतिस्पर्धी कोण राहणार, हे अद्याप ठाऊक नसले तरी विजयाची आपल्याला पूर्ण खात्री आहे, असेही ते म्हणाले. नागपूरनंतर औरंगाबाद आणि पुणे येथूनही डॉ. काळे हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करणार आहेत. पत्रपरिषदेला अरुणा सबाने, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. अमृता इंदूरकर, प्रा. अनिल नितनवरे तसेच इतर समर्थक उपस्थित होते.

महामंडळ अध्यक्षांना समर्थन
साहित्य संमेलन साधेपणानेच व्हायला हवे, ही माझीही भूमिका आहे. मात्र, ते करणे माझ्या हातात नाही. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी सातत्याने हा विषय मांडत आहे आणि त्यांच्या म्हणण्याला माझे अनुमोदन आहे, असे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले. संमेलनाध्यक्षाला मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी एक लाख रुपयांचा निधी मिळतो. त्या एक लाखात माझी स्वतःची तेवढीच रक्कम घालण्याची माझी तयारी आहे. पण मे काम करणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

बंद लिफाफ्यात अर्जच आहे!
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मदन कुळकर्णी यांनीदेखील संमेलनाध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला आहे. डॉ. कुळकर्णी यांनी वि. सा. संघाकडे बंद लिफाफा सादर केला असून, १० ऑक्टोबरपर्यंत तो उघडू नये, असेही सांगितले आहे. ‘त्यांनी बंद लिफाफा दिला असून, त्यामध्ये अर्ज असल्याचे सांग‌ितले आहे. आपले सूचक आणि अनुमोदक कोण आहेत, हे उघड केले जाऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. १२ ऑक्टोबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. तो लिफाफा या कालावधीत केव्हा उघडायचा, हे डॉ. कुळकर्णी नंतर सांगतील. तोवर हा लिफाफा बंदच ठेवण्यात येणार आहे,’ अशी माहिती वि. सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांनी दिली.बंद लिफाफा म्हणजेच अर्ज असल्याचे वि. सा. संघाने गृहित धरल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात डॉ. काळे आणि डॉ. कुळकर्णी असे दोन उमेदवार आले आहेत. मात्र, या बंद लिफाफा प्रकारामुळे संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गूढ ‘ट्विस्ट’ आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>