Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,चंद्रपूर

मूलपासून सुमारे सहा किमी अंतरावरील काटवन येथील जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात एक ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

मूल वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या काटवन येथील सुरेश गंगाराम कन्नाके (४६) हे त्यांच्या हरविलेल्या बैलांना शोधण्यासाठी नजीकच्या जंगलात गेले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळनंतरही ते घरी परतले नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता सुरेश यांचा मृतदेह काटवन नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५६मध्ये सापडला. अस्वलाच्या हल्यात ते ठार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा असून अस्वलाने त्याच्या डोक्याला जबर इजा केली होती. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळी वनविभागाने पंचनामा करून मृताचे शवविच्छेदन मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. मृताच्या नातेवाइकांना वनविभागाच्यावतीने २५ हजार रुपयांची तातडीची मदतही देण्यात आली. वनविभागाने या भागात गस्त वाढवली असून गावकऱ्यांना जंगलात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भागात वाघ, बिबट अस्वलाचे अस्तित्व असून जंगलात एकट्याने जाऊ नये यासाठी काटवन, करवन या गावांसह आसपासच्या गावांना सूचना देण्यात येत असल्याची माहिती मूलचे वनपरिक्षेत्राधिकारी ओमप्रकाश पेंदोर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>